फडणवीसांच्या काळात 500 कोटींचा भ्रष्टाचार..

0
167

मुंबई : १०/३/२०२३

महाराष्ट्राच्या राजकारणात आरोप प्रत्यारोप अद्यापही सुरूच..

एकमेकांकडून चिखल फेक सुरूच..

त्यात आता वादाची फोडणी घातली अजित पवारावांनी हे विधान करून..

विरोधी पक्ष नेते अजित पवारांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना 500 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप केलाय..

माहिती आणि जनसंपर्क विभागात 2017 18 या काळात हा भ्रष्टाचार झाल्याचा त्यांनी म्हटलय..

या विभागाचे तत्कालीन महासचिव सामाजिक न्याय विभागाचे माजी सचिव आणि सहा अधिकारी यांनी मुख्यमंत्र्यांची मंजुरी न घेताच 500 कोटींच्या जाहिराती मंजूर केल्याचा त्यांनी म्हटलंय..
त्यामुळे पुन्हा वादाची फोडणी राजकारणात टाकल्याने कोणावर काय शिमगे उडतात हे पाहणं महत्त्वाचे ठरेल..
ब्युरो रिपोर्ट एम.डी.टी.व्ही न्यूज मुंबई

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here