‘द केरला स्टोरी’ ला शहाद्यात महिलांची सर्वाधिक पसंती ..

0
341

नंदुरबार : ८/५/२३

थेट शहाद्यातून चित्रपट गृहातून संजय मोहितेंचा एक्सक्लूझिव्ह रिपोर्टींग ..

द केरळ स्टोरी हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. नुकताच द केरळ स्टोरी हा चित्रपट रिलीज झालाय.

चित्रपट रिलीज झाल्यानंतर ही वाद काही थांबताना दिसत नाहीये.

मात्र, या चित्रपटाला प्रेक्षकांचा जबरदस्त असा प्रतिसाद मिळताना दिसतोय. चित्रपट धमाल करतोय.

प्रेक्षक महिला चित्रपट गृहात सिनेमाचा आनंद घेताना ..

द केरळ स्टोरी (The Kerala Story) हा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट अनेक मोठ्या वादांनंतर रिलीज झालाय.
या चित्रपटाचे टीझर आणि ट्रेलर रिलीज झाल्यापासून मोठा गोंधळ निर्माण झाला.
सतत या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली जात होती.
अनेकांनी तर चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होताच कोर्टामध्ये धाव घेतल्या.
मात्र, शेवटी अनेक वादांनंतर हा चित्रपट रिलीज झाला.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा.

https://bit.ly/3UoK7E0
विशेष म्हणजे पहिल्याच दिवशी या चित्रपटाला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद मिळताना दिसतोय. इतकेच नाही तर विकेंडला द केरळ स्टोरी हा चित्रपट (Movie) धमाल करेल असा दावा सातत्याने केला जातोय.
या चित्रपटामध्ये अनेक मोठे आणि धक्कादायक (Shocking) खुलासे हे करण्यात आले आहेत.
या चित्रपटाचा नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरातील मनोरंजन टॉकीजमध्ये मोफत शो आयोजित करण्यात आला.
दुपारी 2 ते 5 वेळच्या शो साठी महिला व युवतींची तुफान गर्दी झाली होती.
विशेष बाब म्हणजे चित्रपट रिलीज झाल्यानंतर त्यावर बंदी घालण्याच्या याचिकेवर केरळ उच्च न्यायालयात सुनावणी झालीये. चाहत्यांसाठी दिलासादायक बातमी म्हणजे न्यायालयाने द केरळ स्टोरी या चित्रपटावर बंदी घालण्यास नकार दिलाय. मात्र, 32 हजार मुली गायब झाल्याचा आणि दहशतवादी संघटना ISIS मध्ये सामील झाल्याचा दावा सोशल मीडियावरून काढून टाकण्यावर चित्रपट निर्मात्यांनी सहमती दाखवलीये.
न्यायमूर्ती नागारेश यांनी म्हटले की, त्या मुली 32 हजार होत्या हे तुम्ही कसे म्हणून शकता? द केरळ स्टोरी चित्रपटाच्या निर्मात्यांची बाजू मांडणाऱ्या रवी कदम यांनी सांगितले की, आम्हाला अशी माहिती सांगण्यात आली होती की, गायब होणाऱ्या मुलींचा आकडा हा 32 हजार होता आणि तिच माहिती ही आम्ही चित्रपटाच्या टिझरमध्ये दाखवली..
तर एका प्रेक्षक महिलेने देखील संवाद साधलाय ..

प्रेक्षक महिला प्रतिक्रिया देतांना ..

चित्रपट निर्मात्यांना दिलासा देत चित्रपटावर बंदी येणार नसल्याचे तर स्पष्ट झाले आहे.
सोमवारी शहाद्यातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ,बजरंग दल, हिंदू एकता संघच्या वतीने महिलांसाठी या चित्रपटाच्या शोचे मोफत आयोजन करण्यात आले होते
चित्रपटही बाॅक्स आॅफिसवर धमाल करताना दिसतोय.
सकाळपासूनच प्रेक्षकांचा द केरळ स्टोरी हा चित्रपट पाहण्यावर अधिक भर दिसतोय.
विशेष म्हणजे सोशल मीडियावर अनेकांनी पोस्ट शेअर करत चित्रपटाचे काैतुक देखील केले आहे. अनेकांना हा चित्रपट जबरदस्त आवडल्याचे दिसत आहे.
याबाबत अनेक हिंदुत्वादी संघटनांनी आपल्या सकारात्मक प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत .. ऐकू या काय म्हणताय या संस्थांचे प्रतिनिधी ..

हिंदुत्वादी संघटनांचे प्रतिनिधी प्रतिक्रिया देतांना

काय नेमकं आहे या चित्रपटात ? जाणून घेऊ या –
केरळमधील तीन युवतींच्या भोवती हे कथानक फिरतं.
चित्रपटाच्या सुरुवातीलाच शालिनी उन्नीकृष्णन ऊर्फ फातिमा (अदा शर्मा) हिला अफगाणिस्तान सीमेवरील सुरक्षा प्रशासन ताब्यात घेतं.
तिथं तिची चौकशी सुरू होते. तिथून कथा उलगडत जाते.
शालिनी, गीतांजली (सिद्धी इदनानी), निमा (योगिता बिहानी) या तिघी आपापल्या शहरांतून केरळमधीलच कासरगोडच्या एका नर्सिंग स्कूलमध्ये प्रशिक्षणासाठी येतात. होस्टेलमध्ये त्यांच्याबरोबर आसिफा (सोनिया बलानी) असते.
एकाच रूममध्ये राहणाऱ्या या चौघींची घट्ट मैत्री होते.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा.

https://bit.ly/3UoK7E0
मात्र, आसिफाच्या कटापासून या तिघी अनभिज्ञ असतात.
आसिफा हळूहळू या तिघींना त्यांच्या मूळ धर्मापासून दूर नेते.
त्यांचं मतपरिवर्तन करून त्यांना एका विशिष्ट धर्माकडे आकर्षित करण्याचा तिचा गुप्त उद्देश आहे.
यासाठी ती आपल्या बनावट भावांचा आधार घेते. सगळं काही नियोजित असतं. शालिनी आणि गीतांजली त्या बनावट भावांच्या प्रेमात पडतात. नंतर त्या तिघींचं पद्धतशीर ‘ब्रेन वॉश’ केलं जातं, त्यांना विशिष्ट धर्माकडे वळवलं जातं.
निमा या भानगडीत पडत नाही. शालिनी आणि गीतांजली मात्र या जाळ्यात फसतात.
नंतर असं काही घडतं की, शालिनी आपली संस्कृती, सर्व काही सोडून ‘आयएसआयएस’मध्ये सामील होते
आणि सीरियात जायला तयार होते.
गीतांजलीला वास्तव कळतं आणि ती विरोध करते; तेव्हा तिला आत्महत्येस प्रवृत्त केलं जातं. तर निमावर सातत्यानं बलात्कार होतो.
कथा खोटी वाटू नये, याची पुरेपूर खबरदारी घेण्यात आलीय.
शालिनीचा पाकिस्तान, अफगाणिस्तानमार्गे सीरियाकडे जाण्याचा प्रवास वेदनांनी भरलेला आहे.
सुरुवातीला विशिष्ट धर्माविषयी तिला चांगली माहिती दिली जाते. मात्र, आपला देश सोडून इस्लामिक देशात गेल्यानंतर तिला भयावहतेची जाणीव होते. गरोदर शालिनीवर अत्याचार होत राहतात.
तिथं तिच्यासारख्याच अनेक युवती तिला भेटतात, ज्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून, त्यांचं मतपरिवर्तन करून, त्यांना विशिष्ट धर्म स्वीकारायला बाध्य करीत इथवर आणलेलं असतं.
पुढं जे जे काही घडतं ते कमालीचं भीषण आहे. ते अनुभवताना आपण स्तंभित होतो.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा.

https://bit.ly/3UoK7E0

अदाचा अभिनय वाखाणण्याजोगा आहे, त्याला कित्येक पैलू आहेत.
केरळमध्ये आपल्या गावी, थिरुवनंतपुरममध्ये असलेली खेळकर, निरागस, हुशार शालिनी ते इस्लामिक देशात फसलेली भयभीत, हतबल, अत्याचारपीडित फातिमा तिनं उत्कृष्टरीत्या साकारली आहे.
सिद्धी, योगिता, सोनिया यांनीही त्यांच्या भूमिकांना चांगला न्याय दिलाय.
इतर कलावंतांनीही त्यांची कामं चोख केली आहेत.
प्रशांतनु मोहापात्रानं केरळचं सौंदर्य आणि इस्लामिक देश, तेथील अत्याचार, हिंसाचार या परस्परभिन्न बाबी लीलया कॅमेराबद्ध केल्या आहेत. चित्रपट ‘डार्क’ झालाय.
हिंसात्मक आणि बलात्काराची दृश्ये विचलित करू शकतात.
मात्र, वास्तव पटवून देण्यास ती साह्यभूत ठरतात.
चित्रपटाचं संकलन आणखी थोडं ‘टाइट’ असतं तर बरं झालं असतं.
पण, असो. विशिष्ट विचारधारा मानली नाही तर आपण ‘दोजख’ अर्थात नरकात जातो, असं आसिफा आपल्या तीन रूममेट्सना सतत पटवून देण्याचा प्रयत्न करीत असते.
मात्र, शालिनी, गीतांजली आणि निमाला जिवंतपणीच ‘दोजख’चं दर्शन होतं.
इस्लामिक देशांतून औषधाच्या रूपात सर्रास येणारे अमली पदार्थ कसे तरुणांच्या गळी उतरविले जातात अन् त्यामुळे मानसिकता कशी हिंसात्मक होत जाते, हेही वास्तव यात आहे.
आपली चूक कळल्यानंतर गीतांजली घरी परतते.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा.

https://bit.ly/3UoK7E0
कम्युनिस्ट विचार जपणाऱ्या आपल्या वडिलांच्या मांडीवर डोकं ठेवून म्हणते, ‘पापा, आप ने विदेश के आदर्श बताने के बजाय हमारी संस्कृती, परंपरा के बारे में मुझे बताया होता तो अच्छा होता’…
हे दृश्य आणि त्याचा आशय भूसभुशीत असला तरी कथानकाच्या संदर्भात आणि त्यातून तयार झालेल्या मानसिकतेला प्रभावी ठरतो.
हे चित्रपटाचे यश आहे..
सिनेमा : द केरला स्टोरी

दिग्दर्शक : सुदीप्तो सेन

लेखन : सूर्यपाल सिंग, सुदीप्तो सेन, विपुल अमृतलाल शा‌ह

निर्माते : सनशाइन पिक्चर्स, विपुल अमृतलाल शाह

कलाकार : अदा शर्मा, योगिता बिहानी, सोनिया बलानी, सिद्धी इदनानी आदी.
महिला ,युवती यांनी हा चित्रपट जरूर पाहावा असं आवाहन चित्रपट निर्माते आणि आयोजकांनी केलंय ..
संजय मोहिते ,शहादा प्रतिनिधी ,एम डी टी व्ही न्यूज ..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here