मौजे-रानीपुर – एक दिवस माझ्या बळीराजासाठी या मोहिमेअंतर्गत कृषी विभागाच्या वतीने लोकसहभागातुन वनराई बंधारे बांधण्याचे काम चालु आहे. व
नराई बंधाऱ्यामुळे पाणी जमिनीत मुरते.आसपासच्या विहिरीचे व कुपनलिकेचे पाणीही वाढते तसेच भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ होण्यास मदत होईल.रब्बी पिकाला सिंचनासाठी संरक्षित पाणी उपलब्ध होण्यास मदत होईल.
यावर्षी राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे पाणी टंचाईच्या बिकट परिस्थितीचा सामना करावा लागणार आहे.वनराई बंधा-यामुळे पाणीटंचाईचे संकट किमान एक दोन महिने लांबविण्यासाठी साखळी पद्धतीने लोकसहभागातून वनराई बंधारे बांधुन जल संधारणास सहाय्यभूत ठरेल.
- Nandurbar News : कृषी संजीवनी पंधरवाड्यात शेतकऱ्यांना मार्गदर्शन…!
- Jalgaon News : अमळनेर तालुक्यातील शाळांमध्ये कोट्यवधींचा भ्रष्टाचार..!
- Nandurbar News Today : कोंडाईबारी घाटात भीषण अपघात..! कंटेनर आणि ट्रकची धडक…
- Nandurbar News Today : धक्कादायक ! फेसबुक आणि व्हाट्सअपद्वारे ६७ लाखांचा गंडा घातला…!
- Nandurbar News Today : तळागाळातील विद्यार्थ्यांचा गुणवत्ता विकास केवळ शिक्षकांवर निर्भर- डॉ. एल.ए.पाटील
गावातील पाळीव तसेच जंगलातील प्राण्यांन पिण्यासाठी पाणी उपलब्ध होईल.सदरील कार्यक्रम यशस्वीपणे राबविण्यासाठी उपविभागीय कृषी अधिकारी,शहादा श्री. तानाजी खर्डे यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली तसेच तालुका कृषी अधिकारी मीनाक्षी वळवी यांचे मार्गदर्शनाखाली साकारण्यात आलेल्या वनराई बंधा-यासाठी गावातील प्रगतशील शेतकरी तसेच कृषी विभागाचे तळोदा मंडळाचे मंडळ कृषी अधिकारी श्रीमती रजनी कोकणी,कृषी पर्यवेक्षक भरत माळी, संदीप दाणी कृषी सहाय्यक मदन कायत, नितीन कलाल, अक्षय नाईक, प्रतेश गांगुर्डे यांनी श्रमदान केले.