Maratha Reservation Latest News – मराठा आरक्षणासाठी मुंबईत Mumbai करण्यात येणाऱ्या आंदोलनाचा मार्ग आंदोलनकर्ते मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange Patil) यांनी गुरूवारी ( २८ डिसेंबर )(maratha reservation latest news ) जाहीर केला. २० जानेवारी रोजी अंतरवाली सराटी येथून निघणारी पदयात्रा सहा जिल्ह्यांतून जाणार असून, यामध्ये हजारो मराठा बांधव सहभागी होणार आहेत.
‘एम.डी टीव्ही’ चं Telegram Group जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
‘एम.डी टीव्ही’ चं Facebook Group जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
या पदयात्रेसाठी मराठा बांधवांना झोपण्यासाठी आणि खाण्यापिण्याच्या वस्तू मुंबईला घेऊन जाव्या लागणार आहेत. यासाठी आंदोलनकर्ते पोलिसांना वाहने बाहेर काढण्यास सांगितले आहे.

“पोलिसांनी मराठा आंदोलकांची वाहनं अडवली, तर देवेंद्र फडणवीसांच्या
(Devendra Fadnavis) नागपूर आणि मुंबईतील घरी जाऊन बसू,” असा इशारा मनोज जरांगे-पाटलांनी दिला आहे.
- Nandurbar News – चेक बाऊन्स प्रकरणात आरोपीला एक वर्ष कारावास आणि भरभक्कम दंड…!
- Allu Arjun Arrested : अल्लू अर्जुनला थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी अटक..!
- Dhule News : दाऊळ गावात दोंडाईचा कृषी महाविद्यालयातील कृषीकन्या दाखल…!
- Maharashtra Election 2024 Date : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे बिगुल अखेर वाजलं, ‘या’ तारखेला होणार मतदान…!
- LIVE TV
जरांगे-पाटलांनी पदयात्रेत येणाऱ्या प्रत्येक तुकडीच्या प्रमुखांनी आणि स्वयंसेवकांनी आपल्या तुकडीतील समाजबांधवांच्या जेवणाची सोय करायची आहे, असेही सांगितले आहे.(Maratha Reservation) यासाठी प्रत्येक वाहनात मीठ, मिरची, तेल, ५० किलो बाजरी पीठ, ५० किलो गव्हाचे पीठ, ५० किलो तांदूळ, डाळी, छोटी चूल, पाण्याचे ड्रम, टँकर बरोबर घ्यावे, असे त्यांनी सुचवले आहे.
या इशाऱ्यामुळे पोलिस प्रशासनामध्ये खळबळ उडाली आहे. पोलिस प्रशासन आंदोलनकर्ते आणि वाहने अडवण्याच्या प्रयत्नांवर कसे नियंत्रण ठेवते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
ब्युरो रिपोर्ट, एम.डी.टीव्ही न्यूज