Ayodhya Ram Mandir – उत्तर प्रदेशात 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्या मंदिरात प्रभू रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी अनेक बड्या व्यक्तींना निमंत्रण पाठवण्यात आले आहे. मात्र, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हे निमंत्रण मिळालेले नाही. यामुळे राजकारणात खळबळ उडाली आहे.
‘एम.डी टीव्ही’ चं Facebook Group जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
‘एम.डी टीव्ही’ चं Telegram Group जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी आज स्पष्ट केले की ते 22 जानेवारीला अयोध्येत जाणार नाहीत. मीनाताई ठाकरे जयंतीनिमित्त दादर शिवाजी पार्क येथे बोलताना ते म्हणाले, “अयोध्येतील राम मंदिराचा उद्घाटन सोहळा धार्मिक आणि अस्मितेचा असावा. हा अभिमान, अस्मिता आणि आनंदाचा क्षण आहे. या सोहळ्याला कोणताही राजकीय रंग देऊ नये. राम आमचा आहे. आम्ही केव्हाही अयोध्येला जाऊ शकतो.”
- Nandurbar News : कृषी संजीवनी पंधरवाड्यात शेतकऱ्यांना मार्गदर्शन…!
- Jalgaon News : अमळनेर तालुक्यातील शाळांमध्ये कोट्यवधींचा भ्रष्टाचार..!
- Nandurbar News Today : कोंडाईबारी घाटात भीषण अपघात..! कंटेनर आणि ट्रकची धडक…
- Nandurbar News Today : धक्कादायक ! फेसबुक आणि व्हाट्सअपद्वारे ६७ लाखांचा गंडा घातला…!
- Nandurbar News Today : तळागाळातील विद्यार्थ्यांचा गुणवत्ता विकास केवळ शिक्षकांवर निर्भर- डॉ. एल.ए.पाटील
उद्धव ठाकरे यांनी 22 जानेवारीला नाशिकमधील काळाराम मंदिरात दर्शन घेणार असल्याचेही सांगितले. प्रभू रामचंद्र काही वर्ष पंचवटीला देखील वास्तव्यास होते. त्यामुळे त्या दिवशी नाशकात गोदावरीच्या तीरावर एक महाआरती देखील होईल, असे त्यांनी सांगितले.
उद्धव ठाकरे यांना राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यासाठी निमंत्रण दिले गेले नसल्याने शिवसेना आणि भाजप यांच्यात राजकारण पेटले आहे. शिवसेनेकडून भाजपवर टीका करण्यात येत आहे.