Ayodhya Ram Mandir – उत्तर प्रदेशात 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्या मंदिरात प्रभू रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी अनेक बड्या व्यक्तींना निमंत्रण पाठवण्यात आले आहे. मात्र, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हे निमंत्रण मिळालेले नाही. यामुळे राजकारणात खळबळ उडाली आहे.
‘एम.डी टीव्ही’ चं Facebook Group जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
‘एम.डी टीव्ही’ चं Telegram Group जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी आज स्पष्ट केले की ते 22 जानेवारीला अयोध्येत जाणार नाहीत. मीनाताई ठाकरे जयंतीनिमित्त दादर शिवाजी पार्क येथे बोलताना ते म्हणाले, “अयोध्येतील राम मंदिराचा उद्घाटन सोहळा धार्मिक आणि अस्मितेचा असावा. हा अभिमान, अस्मिता आणि आनंदाचा क्षण आहे. या सोहळ्याला कोणताही राजकीय रंग देऊ नये. राम आमचा आहे. आम्ही केव्हाही अयोध्येला जाऊ शकतो.”
- Trump Vs Modi : एका फोन कॉलची किंमत ५००% टॅरिफ? मोदी-ट्रम्प यांच्यातील ‘कोल्ड वॉर’ सुरू..!
- Maharashtra Expressway – ‘समृद्धी’नंतर महाराष्ट्राला मिळणार ‘पुणे-बंगळूर’ ग्रीन फील्ड…!
- Shreyas Iyer ची प्रकृती चिंताजनक सिडनीतील रुग्णालयात ICU मध्ये उपचार सुरू..!
- देशाचे ५३ वे सरन्यायाधीश कोण ? CJI Gavai यांनी सुचवले मोठे नाव..
- बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी Maharashtra Schools चा मोठा निर्णय! एक्झाम फॉर्म भरण्यासाठी आता ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ
उद्धव ठाकरे यांनी 22 जानेवारीला नाशिकमधील काळाराम मंदिरात दर्शन घेणार असल्याचेही सांगितले. प्रभू रामचंद्र काही वर्ष पंचवटीला देखील वास्तव्यास होते. त्यामुळे त्या दिवशी नाशकात गोदावरीच्या तीरावर एक महाआरती देखील होईल, असे त्यांनी सांगितले.
उद्धव ठाकरे यांना राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यासाठी निमंत्रण दिले गेले नसल्याने शिवसेना आणि भाजप यांच्यात राजकारण पेटले आहे. शिवसेनेकडून भाजपवर टीका करण्यात येत आहे.


