नंदुरबार : ०७ /०३/२०२३
नंदुरबार तालुक्यातील कांढरे येथे काल सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्यास अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात शेती पिकाच आणि पशुधनाचं मोठं नुकसान केलं..
शेतातील टरबूज पिकाची लागवड केली होती व ते पीक आता काढणीवर येऊन ठेपले होते
मात्र अशातच अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने या पिकांचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं..
नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री तथा आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांच्यासह तहसीलदार भाऊसाहेब थोरात ,सरपंच लोटन पाटील ,सुपडू पाटील तलाठी भाजप पदाधिकारी कार्यकर्ते यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्यात..
![2 1](https://mdtvnews.in/wp-content/uploads/2023/03/2-1-1024x576.jpg)
संबंधित यंत्रणेला तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले असून लवकरच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्यांची नुकसान भरपाई मिळेल असं देखील डॉक्टर गावितांनी म्हटलंय..
![3](https://mdtvnews.in/wp-content/uploads/2023/03/3-1024x576.jpg)
समाधान ठाकरे ग्रामीण प्रतिनिधी दोंडाईचा एम.डी.टी.व्ही न्यूज